धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज धरणगाव येथील तहसील कार्यालयात ‘आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक’ यांच्या सर्वसाधारण सभेचे आणि धरणगाव तालुक्याच्या कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील तब्बल ९० सेतू चालक उपस्थित होते. यावेळी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि इतर विविध समस्यांवर चर्चा विनिमय करण्यात आला. या समस्यांचे निराकरण व्हावे आणि संबंधित कामे सुरळीतपणे पार पडावीत यासाठी शासन दरबारी मागणी करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच, फार्मर आयडी, संजय गांधी विधवा पेन्शन योजना अर्ज, रेशन कार्ड आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रे यांसारख्या विषयांवरही उपस्थितांनी विचारमंथन केले.
या बैठकीला धरणगाव तालुक्यातील चेतन जाधव, प्रशांत बच्छाव, सुबोध खैरनार, बंटी महाजन, चेतन देशमुख, निलेश पाटील, ज्योती भाटिया, ईश्वर फुलपगार, सुशील महाजन, योगेश पाटील, अनिल बडगुजर, भूषण बाविस्कर, दिगंबर सोनवणे, सागर दुगे, गाजी शेख, जावेद खान, किशोर कोळी, पंकज वाणी, प्रशांत महाजन, स्वप्निल भाटिया, समीर शेख, उज्ज्वल देवरे, विशाल भाटिया, वीरेंद्र निकुंभ, सचिन सोनवणे, रवींद्र मोरे, राजेश महाजन, प्रदीप पाटील, कुणाल गोसावी, गोविंदा पाटील, गणेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि सीएससी सेंटर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक धरणगावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सेतू चालकांच्या एकजुटीचे प्रतीक ठरली.