पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या पारोळा तालुका शाखेने ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त आणि ६ जून रोजी येणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भुईकोट किल्ल्यावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या वेळी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत ‘झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला श्री रोहन वसंतराव मोरे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, जिल्हा चिटणीस नाना सुखदेव पाटील, संयोजक राजेंद्र चौधरी, युवराज नाना पाटील, देविदासजी पाटील, वालचंदजी नंदवाणी, सोनवणे सर, बंडू नाना वाणी, प्रकाशजी पुरकर, भूषण टिपरे, अमोल देशमुख आणि राहुल पाटील सर यांसह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच ऐतिहासिक वारशाचे महत्त्व जपण्याचा संदेशही देण्यात आला.